झोप ही अत्यावश्यक आहे. मात्र, दुपारी जेवण झाल्यावर झोप येतेच. परंतु ही सवय आरोग्यासाठी अत्यंत धोकादायक आहे. यामुळे शरीराला अनेक व्याधी जडतात. दुपारच्या झोपेमुळे कफदोष आणि पचनाचे दोष निर्माण होतात. या व्याधींपासून दूर राहायचे असेल तर दुपारची झोप टाळावी. त्याचे वाईट परिणाम काय आहेत.
त्वचेचे विकार…
कफ आणि पित्तदोष निर्माण होऊन अंगाला खाज येऊ शकते. याचसोबत रक्त दूषित होण्याचीही शक्यता असते. यामुळे एक्जिमा, सोरायसिस, शीतपित्त, तीळ आणि वांग यांसारखे त्वचेचे विकार बळावू शकतात. केसात कोंडाही होऊ शकतो.
मधुमेह वाढतो…
पचनाची क्रिया असंतुलित होते. यामुळे रक्तातील साखरेचं प्रमाण वाढतं.
जखम न भरणे…
कफदोष वाढतो. यामुळे पस निर्माण होऊन जखम चिघळू शकते.