लिंबू : मधुमेह असलेल्या रुग्णांना जास्त तहान लागते. वारंवार तहान लागत असेल तर पाण्यामध्ये लिंबू पिळून पिल्याने तहान भागवता येते.
काकडी : मधुमेहींना भुकेपेक्षा कमी व हलका आहार घेण्याचा सल्ला दिला जातो. अशा वेळी वारंवार भूक लागल्यास काकडी खाऊ शकता.
जांभूळ : याला मधुमेहींचे फळ असे म्हटल्यास अतिशयोक्ती ठरणार नाही. कारण याच्या बिया, साल, रस आणि गर सर्वच मधुमेहामध्ये फायद्याचे आहे. जांभळाच्या बिया वाळवून चूर्ण बनवा. दिवसातून दोन-तीन वेळा तीन ग्रॅम चूर्ण पाण्यासोबत घेतल्याने मुत्रातील साखरेचे प्रमाण कमी होते.
मेथीदाणे व दालचिनी : मेथीमुळे इन्सुलिनचा स्राव वाढतो आणि कार्बोहायड्रेट्स शोषून घेण्याचे प्रमाणही कमी राहते. याचा वापर पावडर किंवा बियांच्या रूपात केला जातो. दालचिनीमुळे साखरेचे प्रमाण नियंत्रणात राहते. त्यामुळे आहारात दोन्हींचा समावेश करावा.