Friday, March 29, 2024
Homeदेशनरेंद्र मोदींमुळे गुजरात होतेय बदनाम- मनीष तिवारी

नरेंद्र मोदींमुळे गुजरात होतेय बदनाम- मनीष तिवारी

नवी दिल्ली– गुजरात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने भाजपवर गंभीर आरोप केले आहेत. भाजपला आता निवडणुकीत पराभवाची भीती सतावत आहे. त्यामुळे भाजप चुकीच्या पद्धतीचा अवलंब करताना दिसत आहे. भाजपच्या या षडयंत्रात निवडणूक आयोगही सहभागी असल्याचा घणाघाती आरोप काँग्रेसचे प्रवक्त मनीष तिवारी यांनी आज (सोमवार) नवी दिल्लीत केला.

मनीष तिवारी यांनी पत्रकारांना संबोधित करताना सांगितले की, निवडणूक आयोगाने गुजरात विधानसभा निवडणुकाच्या तारखा जाहीर का केल्या नाहीत.? आयोगाने तारखा तात्काळ जाहीर करून गुजरातमध्ये आचारसंहिता लागू करावी.

नरेंद्र मोदींमुळेच गुजरात बदनाम
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळेच गुजरात बदनाम होत आहे. गुजरातची जनता आता मोदींच्या भूलथापा बळी पडणार नाही. त्यामुळे भाजपने आतापासूनच नेत्यांचा घोडेबाजार सुरु केला आहे. गुजरातमधील जनतेने भाजपविरोधात विद्रोह सुरु केला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments