नवी दिल्ली – गुजरातच्या जनतेने मला भरभरून प्रेम दिले. सगळ्यात महत्वाचे म्हणजे, त्यांनी मला रागाला प्रेमाने हरवायला शिकवले. तुमच्या लढाईत कितीही पैसा असूदे, द्वेष असूदे, त्याचा तुम्ही प्रेमाने पराभव करू शकता, हा संदेश या निकालातून मिळाला आहे. मी या निकालाने संतुष्ट आहे, माझ्यासाठी हा निकाल खूप चांगला आहे. आम्ही जिंकू शकत होतो, पण थोडे कमी पडलो, अशी प्रतिक्रीया राहुल गांधी यांनी दिली आहे. ते प्रसार माध्यमांशी बोलत होते.
या निकालानंतर आता पंतप्रधान मोदींच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. तसेच, गुजरातमधील विधानसभा निवडणुकीच्या निकालाने मोदींना एक संदेश दिला आहे. जो राग मोदींच्या मनात आहे तो त्यांच्या कामी येणार नाही, त्याच्यावर प्रेमाने मात केली जाईल असेही, राहुल गांधी म्हणाले.