बेरहमपूर(ओरिसा) – आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी जातीयवादी शक्तिंविरोधात लढण्यासाठी धर्मनिरपेक्ष पक्षांची पर्यायी आघाडी उभारण्याची गरज असल्याचे, माकपचे सरचिटणीस सीताराम येचुरी यांनी म्हटले आहे. राज्यातील पक्ष कार्यकर्त्यांची बैठक येचुरी यांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आली होती. या बैठकीनंतर येचुरी यांनी पत्रकारांशी बोलतांना माहिती दिली.
येचुरी यांनी सत्ताधारी भाजप सरकारला जीएसटी तसेच आर्थिक धोरणांवरुन लक्ष्य केले. पर्यायी राजकीय आघाडी उभारताना नेते महत्वाचे नसून निती गरजेची आहे. याकरता धर्मनिरपेक्ष नेत्यांशी निवडणुकीपूर्वी चर्चा करणार असल्याचे येचुरींनी म्हटले आहे.