होता. मात्र भाजपने सत्ता स्थापनेचा दावा करत, येडियुरप्पा यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या शपथविधीचा सोहळाही पार पाडला. कर्नाटकात सुरू असलेला गोंधळ घटना नष्ट करण्यासाठी रचलेला कट आहे. देशात सत्तेत आल्यापासून भाजप सरकारी यंत्रणेचा गैरवापर करत असल्याचा घणाघाती आरोप मायावती यांनी केला.
काय म्हणाल्या मायावती
कर्नाटकात सुरू असलेला गोंधळ घटना नष्ट करण्यासाठी रचलेला कट आहे. देशात सत्तेत आल्यापासून भाजप सरकारी यंत्रणेचा गैरवापर करत असल्याचा घणाघाती आरोप मायावती यांनी केला.
सत्ता स्थापनेचे कर‘नाटक‘ :
सर्वोच्च न्यायालयाने शपथविधीसाठी हिरवा कंदील दिल्यानंतर येडियुरप्पा यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.
राज्यपाल वीजुभाई वाला यांनी येडियुरप्पा यांना बहुमत सिद्ध करण्यासाठी १५ दिवसांचा अवधी दिला आहे. दरम्यान, काँग्रेस-जेडीएसने राज्यपालांच्या निर्णयाविरोधात निदर्शने केली. उद्या सर्वोच्च न्यायालयात याप्रकरणावर पुन्हा सुनावणी होणार आहे.