झारखंड : येत्या चार महिन्यात आकाशाला गवसणी घालणारं भव्य राम मंदिर उभारलं जाईल अशी घोषणा केंद्रीय गृहमंत्रीयांनी केली. झारखंड येथील प्रचारसभेत अमित शाह यांनी ही घोषणा केली.
झारखंड येथील पाकुडमध्ये अमित शाह यांची सभा झाली. वादग्रस्त जागेसंदर्भातला निर्णय चर्चेतून सुटावा असं आम्हाला वाटत होतं. मात्र चर्चा निष्फळ ठरली, तेव्हा न्यायालयाने रोज सुनावणी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर जो निर्णय सुप्रीम कोर्टाने दिला तो सर्वांसमोर आहे असंही अमित शाह यांनी स्पष्ट केलं.
सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयामुळे अयोध्येत राम मंदिर उभारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे येत्या चार महिन्यात भव्य राम मंदिर उभारु अशी घोषणा मी करतो आहे” असं अमित शाह यांनी स्पष्ट केलं. एवढंच नाही तर राम मंदिराचं प्रकरण काँग्रेसने प्रलंबित ठेवलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वातील सरकारने मात्र हे प्रकरण मार्गी लावलं. इतरही प्रकरणं मार्गी लावली. असं अमित शाह म्हणाले.