मुंबई : बुलेट ट्रेन आमचं स्वप्न नाही असं मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी स्पष्ट केलं. बुलेट ट्रेनचा उपयोग कोणाला होणार आहे. त्याच्यामुळे इथे किती उद्योधंद्यांना चालना मिळणार आहे. ते पटवून द्या मग पाहू काय करायचे ते असं मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी स्पष्ट केलं आहे.
मुख्यमंत्री उध्दव ठाकरे म्हणाले, बुलेट ट्रेन हे पंतप्रधानांचा प्रोजेक्ट जरी असलं तरी जेव्हा जाग येते तेव्हा वस्तुस्थिती समोर असते. स्वप्न नसतं. केंद्राकडून येणारी मदत मिळायला हवी तशी ती काही आलेलीच नाहीये हे सत्य आहे. आजही महाराष्ट्र कर्जाच्या ओझ्याखाली दबलं गेलंय. असं मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी स्पष्ट केलं.