केरळ: लेनिन, तामिळनाडूतील द्रविडी चळवळीचे संस्थापक आणि ज्येष्ठ समाजसुधारक ई. व्ही. रामस्वामी पेरियार यांच्या पुतळ्यांची तोडफोड केल्यानंतर आता केरळमधील कन्नूर येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आल्याची घटना समोर आली आहे.
कन्नूरमधील थालिपरंबा परिसरात अज्ञातांनी गांधीजींच्या पुतळ्याचा चष्मा तोडला. मूर्तीची विटंबना केल्यानंतर समाजकंटक फरार झाले आहेत. दरम्यान, स्थानिक पोलीस याप्रकरणाची चौकशी करत आहेत. यापूर्वी बुधवारी ७ मार्च ला उत्तर प्रदेशात डॉ. बाबासाहेब आंबेडकर तर कोलकात्यात जनसंघाचे संस्थापक डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी यांच्या पुतळ्यांचीही विटंबना करण्यात आली. या महापुरुषांच्या पुतळ्यांची तोडफोड करण्याच्या घटनांचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र निषेध केला असून, दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, असे आदेश केंद्र सरकारने सर्व राज्यांना दिले आहेत. केली. तसेच दोषींविरुद्ध कठोर कारवाईचा इशाराही दिला.