नवी दिल्ली: स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खा. राजू शेट्टी यांनी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांच्यासह दिल्ली येथे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची भेट घेऊन शेतक-यांच्या प्रश्नांवर चर्चा केली.
यावेळी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व महाराष्ट्राचे प्रभारी मोहन प्रकाश, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस मुकुल वासनिक उपस्थित होते.