Placeholder canvas
Thursday, April 25, 2024
Homeदेशमुस्लिमांनी अयोध्येचा दावा सोडावा अन्यथा भारत सीरिया बनेल - श्री श्री रवि...

मुस्लिमांनी अयोध्येचा दावा सोडावा अन्यथा भारत सीरिया बनेल – श्री श्री रवि शंकर

sri sri ravi shankarमहत्वाचे…
१. राम जन्मभूमी-बाबरी मशीद प्रकरणी आर्ट ऑफ लिव्हिंगचे संस्थापक श्री श्री रवि शंकर यांच वादग्रस्त विधान
२. राम मंदिर मुद्यावर लवकर तोडगा निघाला नाही तर भारत सीरिया बनेल
३. मुस्लिमांना अयोध्येवरील दावा सोडण्याचे आवाहन


नवी दिल्ली: राम मंदिर मुद्यावर लवकर तोडगा निघाला नाही तर भारत सीरिया बनेल असे वादग्रस्त विधान आर्ट ऑफ लिव्हिंगचे संस्थापक श्री श्री रवि शंकर यांनी वादग्रस्त विधान केले. राम जन्मभूमी-बाबरी मशीद वादावर तोडगा काढण्यासाठी रविशंकर  प्रयत्न करत आहेत.

राम मंदिर वादावर लवकर तोडगा निघाला नाही तर भारताचा सीरिया बनेल असे विधान त्यांनी इंडिया टुडेशी बोलताना केले. सीरियामधील गृहयुद्ध लक्षात घेऊन मुस्लिमांनी अयोध्येवरील दावा सोडून द्यावा. सदिच्छा, मित्रभावनेच्या हेतूने मी मुस्लिमांना अयोध्येवरील दावा सोडण्याचे आवाहन करतो. अयोध्या हे मुस्लिमांच्या विश्वासाचे स्थान नाही असे रवि शंकर यांनी सांगितले.

भगवान प्रभू रामचंद्रांचा दुसऱ्या जागेवर जन्म होऊ शकत नाही असे ६१ वर्षीय अध्यात्मिक गुरु रवि शंकर यांनी म्हटले आहे. रविशंकर यांनी ज्या सीरियाचा दाखला दिला तिथे  राष्ट्राध्यक्ष बाशर अल असाद यांचे सरकार आणि त्यांच्या विरोधी गटांमध्ये रक्तरंजित लढाई सुरु आहे.  अयोध्य प्रकरणावरुन तशीच स्थिती भारतात उदभवेल असे रवि शंकर यांना वाटते. सीरियामध्ये सुरु असलेल्या या गृहयुद्धाचे हे आठवेवर्ष असून आतापर्यंत ४ लाख ६५ हजार सीरियन नागरिकांचा या लढाईत मृत्यू झाला आहे. दहालाखापेक्षा जास्त नागरिक जखमी झाले आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments