लातूर :मी सामान्य जनतेचा प्रतिनिधी आहे .सामान्य जनतेच्या अडचणी सोडविण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनात चौकीदार म्हणून काम करण्यासाठी मला संधी द्या, असे आवाहन भाजपा – सेना युतीचे उमेदवार सुधाकर शृंगारे यांनी केले .
लातूर ग्रामीण मतदारसंघातील शिवली येथे आयोजित अटल बुथ संमेलनात सुधाकर शृंगारे बोलत होते . या कार्यक्रमास ग्रामीणचे नेते रमेशअप्पा कराड , जि प सदस्य सुरज शिंदे ,साहेबराव मुळे ,रेणापुर पंचायत समितीचे सभापती अनिल भिसे, रेणापुरचे नगराध्यक्ष अभिषेक आकनगिरे, चंद्रकांत कातळे ,तालुकाध्यक्ष दशरथ सरवदे ,पद्माकर मुळे शिवलीचे सरपंच सोमनाथ पावले,बालाजे शिंदे ,सुग्रीव आळणे ,धनराज खोजे , युवा पद्माकर चिंचोलकर ,मोर्चा अध्यक्ष राजकिरण साठे ,नागराज रिंगणकर ,युवा मोर्चा सरचिटणीस रामलिंग शेरे , अभिजीत मद्दे यांची उपस्थिती होती .
आपल्या भाषणात सुधाकर शृंगारे म्हणाले की ,पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपले संपूर्ण आयुष्य देशासाठी समर्पित केले आहे देशातील गोरगरीब जनतेच्या विकासासाठी ते रात्रंदिवस मेहनत करीत आहेत . मागच्या पाच वर्षात मोदी यांनी केलेल्या कामामुळे जगात भारताचा सन्मान वाढला आहे . देशात पुन्हा एकदा मोदी यांच्याच नेतृत्वात सरकार स्थापन होणार आहे .मोदी यांच्यासोबत चौकीदार म्हणून काम करण्यासाठी जनतेने मला संधी द्यावी असे आवाहनही त्यांनी केले .
यावेळी बोलताना ग्रामिणचे नेते रमेश अप्पा कराड म्हणाले की ,लातूर ग्रामीण मतदारसंघाला फार मोठा वारसा आहे . या मतदारसंघाने कायमच भाजपाला साथ दिली आहे . यावेळीही सुधाकर शृंगारे यांना ग्रामीण मतदारसंघातून एक लाखाचे मताधिक्य देण्याचा निर्धार कार्यकर्त्यानी केला आहे . शृंगारे यांना निवडून आणण्यासाठी कार्यकर्ते जोमाने कामाला लागले असल्याचे अप्पा म्हणाले .
या मेळाव्यास ग्रामिण मतदारसंघातील शक्ती केंद्र प्रमुख,बुथ प्रमुख ,पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती .