Placeholder canvas
Thursday, April 25, 2024
Homeक्रीडाहॉकीत भारताने मलेशियाचा केला पराभव

हॉकीत भारताने मलेशियाचा केला पराभव

आशिया खंडातील हॉकीवर भारताने आपलं वर्चस्व पुन्हा एकदा प्रस्थापित करत आशिया चषक आपल्या नावे केला आहे. अंतिम सामन्यात मलेशियाच्या संघावर २-१ अशी मात करत भारताने आशिया चषकावर आपलं नाव कोरलं आहे. बांगलादेशमधील ढाका येथे हा सामना खेळवण्यात आला होता. या सामन्यावर अखेरच्या मिनीटात मलेशियाची झुंज मोडीत काढत भारताने विजेतेपद आपल्या नावे कायम केलं. आशिया चषकातलं भारताचं हे तिसरं विजेतेपद ठरलं. साखळी फेरीतले सर्व सामने आणि सर्वोत्तम ४ गटात अपराजित राहण्याचा विक्रम केल्यानंतर भारतीय संघ मलेशियावर मात करण्याच्या उद्देशाने मैदानात उतरला होता. सामन्याच्या पहिल्या मिनीटापासून भारताने आपल्या खेळात आक्रमकता ठेवली होती. भारताच्या आघाडीच्या फळीतल्या ताळमेळाचं उत्तम उदाहरण अवघ्या तिसऱ्या मिनीटाला दिसून आलं. एस. व्ही. सुनील आणि रमणदीप सिंह यांनी रचलेल्या सुरेख चालीचं रुपांतर गोलमध्ये झालं. तिसऱ्या मिनीटाला मिळालेल्या या आघाडीमुळे भारताचा संघ सामन्यात वरचढ झालेला पहायला मिळाला. यानंतर पहिल्या सत्रात भारताने मलेशियाला सामन्यात वरचढ होण्याची संधी दिली नाही.

दुसऱ्या सत्रात मलेशियाने आपल्या खेळात सुधारणा केली. आक्रमक चाली रचत मलेशियाच्या आघाडीच्या खेळाडूंनी भारतीय बचावफळीवर आक्रमणं केली. मात्र भारताचा बचाव मोडणं त्यांना जमलं नाही. गोल करण्याच्या काही सुरेख संधी मलेशियाच्या खेळाडूंनी घाई करत वाया घालवल्या. भारतालाही दुसऱ्या सत्रात पेनल्टी कॉर्नवर गोल करण्याची संधी चालून आली होती, मात्र मलेशियाच्या गोलकिपरने उत्तम बचाव करत भारताच्या मनसुब्यांवर पाणी फिरवलं. मात्र दुसरं सत्र संपत असताना भारताच्या आघाडीच्या फळीतील गुरजंत सिंहने दिलेल्या पासवर २९ व्या मिनीटाला ललित उपाध्यायने बॉलला गोलपोस्टची दिशा दाखवत भारताची आघाडी २-० ने वाढवली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments