कोल्हापूर : ५०० उठाबशा शिक्षा प्रकरणी पीडित विद्यार्थिनीला मुंबईला हलवलंय. माझी मुलगी लवकर बरी व्हावी, म्हणून आम्ही तिला मुंबईच्या केईएममध्ये हलवतोय, अशी प्रतिक्रिया मुलीच्या वडील वडिलांनी दिली. आता मुलीवर पुढील उपचार मुंबईच्या केईएममध्ये होणार आहेत.
कोल्हापूर जिल्ह्यातील कानूर गावात ही घटना घडली आहे. या गावातील भावेश्वरी शाळेत संबंधित विद्यार्थिनी आठवीत शिकते आहे. तिने गृहपाठ केला नव्हता. या कारणासाठी शाळेच्या शिक्षिका अश्विनी देवाण यांनी तिला ५०० उठबशा काढण्याची शिक्षा सुनावली. ३०० उठबशा काढल्यावर मुलगी कोसळली. तिला तात्काळ रूग्णालयात भरती करण्यात आलं आहे. विद्यार्थिनीला ५०० उठाबशांची शिक्षा सुनावणाऱ्या मुख्याध्यापिका अश्विनी देवाण यांना अटक करण्यात आली आहे. तिला जामीनही मिळाला.