नाशिक – मुंबई-आग्रा महामार्गावर वाडीवरे गावाजवळ टेम्पो पलटी झाल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात २ ठार ४० जण जखमी झाले आहेत. गोपाळ पवार आणि कार्तिक माळी या ५ वर्षीय चिमुकल्याचा मृतांमध्ये समावेश आहे. नाशिकवरुन आसवली येथे लग्नासाठी नवरदेवाला घेऊन जात असताना ही घटना घडली आहे.
जखमींमध्ये लहान मुले अधिक आहेत. जखमींवर नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु करण्यात आले आहेत. मृतांमध्ये गोपाळ पवार ( वय २८ वर्ष ), कार्तिक माळी ( वय ५ वर्ष ) यांचा समावेश आहे. या प्रकरणी वाडीवरे पोलीस अधिक तपास करत आहेत. गाडीचे स्टेरिंग खराब झाल्यामुळे गाडीवरील चालकाचा ताबा सुटला, त्यामुळे ही घटना घडल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.