अमरावती: कर्जमाफीची गरज बड्या शेतकऱ्यांना नाही, तसंच सरसकट कर्जमाफी अशक्य असल्याचं मत सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी व्यक्त केलं आहे. ते अमरावतीच्या नेरपिंगळाई गावात बोलत होते.
सध्या राज्यातील ४१ लाख शेतकऱ्यांची ग्रीन लिस्ट तयार झाली असून लवकरच त्यांच्या खात्यात पैसे जमा होतील. शासनाने एकूण २० हजार कोटी रुपयांची कर्ज माफी केली आहे. सध्या अर्ज छाननीचे काम सुरु असल्याने वेळ होत आहे. जोपर्यंत अर्ज येत राहतील तो पर्यंत कर्ज माफी देत राहू असेही यावेळी त्यांनी सांगितलं आहे.