मुंबई: पालघर लोकसभा पोटनिवडणूकीत भाजपाने काँग्रेसचे माजी मंत्री राजेंद्र गावीत यांना भाजपात प्रवेश देऊन उमेदवारी जाहीर केली. शिवसेनेने श्रीनिवास वनगा यांना उमदेवारी दिलेली आहे. काँग्रेस आणि बहुजन विकास आघाडीही आपले उमदेवार देणार असल्यामुळे चौरंगी लढत होणार आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत शिवसेनेवर आरोप केला की, शिवसेनच असं वागण चुकीच आहे. शिवसेनेन श्रीनिवास वनगा यांना शिवसेनेने अज्ञातस्थळी ठेवलं होत. त्यांना कुणाशीही भेट होणार नाही अशा प्रकारे ठेवले होते. चिंतामण वनगा यांची पालघरची जागा होती यावर भाजपाचाच हक्क होता. भाजपाचाच उमदेवार निवडणूक आल्यावर ही वनगा यांना खरी श्रध्दांजली ठरेल. अजूनही वेळ गेली नाही शिवसेनेने भाजपाच्या उमदेवाराला पाठिंबा द्यावा असे सांगितले.