गेला दोन दिवसांपासून ग्राहकांमध्ये नवीन फतव्यामुळे उद्रेक झाला होता. पंजाब आणि महाराष्ट्र सहकारी बँकेतून (पीएमसी) खातेदारांना एक हजार रुपयेच बँकेतून काढता येत होते. मात्र, आता दहा हजार रुपये काढण्याची मुभा रिझर्व्ह बँकेने दिली आहे.
आरबीआयने नोटिफिकेशनमध्ये म्हटले की, बचत आणि करंट खात्यातून बँकेच्या खातेदारांना दहा हजार रुपये काढता येतील. यापूर्वी जर कोणी दहा रुपये बँकेतून काढले असतील तर त्या खातेदारालाही नव्या मर्यादेप्रमाणे पैसे काढता येतील. आरबीआयच्या या आदेशानंतर बँकेचे ६० टक्के खातेधारक आपले पूर्ण पैसे काढू शकतील. त्यामुळे ग्राहाकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.