मुंबई : विधानसभा निवडणुकीत उमेदवारांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यासाठी भाजपा पक्षश्रेष्ठींची चांगील गोची होत आहे. तब्बल 21 दिवसांवर मतदान येऊन ठेपले आहे. तरी सुध्दा भाजपाकडून उमेदवारांचे नाव फायनल करताना नाकीनऊ आले आहेत.
पक्षाच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक आज रविवारी, २९ सप्टेंबर रोजी दिल्लीत होत आहे. नेत्यांची ही दुसरी बैठक होत आहे. यापूर्वी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह, कार्याध्यक्ष जे.पी.नड्डा यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील व इतर नेत्यांसोबत बैठक झाली आहे. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे त्यावेळी परदेशात असल्याने त्यावर शिक्कामोर्तब झाले नव्हते. मोदी हे शनिवारी रात्री परदेश दौऱ्यावरून भारतात परतले आहेत. त्यामुळे रविवारी भाजपाच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक होणार आहे. या बैठकीमध्ये काय होणार, याकडे सर्वांच लक्ष लागला आहे.