मुंबई : राज्यात सत्तासंघर्षावरून पेच कायम असताना, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट घेतली. या दोघांमध्ये जवळपास दीडतास चर्चा झाली. मात्र संघकार्यालयाकडूनही मातोश्रीच मन वळविण्यात यश आलं नाही, अशीच चर्चा सुरु आहे.
दोन दिवसापूर्वीच फडणवीस यांनी भाजपा अध्यक्ष केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची दिल्लीत भेट घेतली होती. त्यानंतर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचीही भेट घेतली होती. मात्र केंद्रीय नेतृत्वाने विधानसभेचा निकाल लागून तेरा दिवस उलटले तरी महाराष्ट्रात लक्ष दिले नाही. त्यामुळे शिवसेना आणि भाजपामधील संबंध आणखी ताणले गेले.
शिवसेना मुख्यमंत्रीपदावर ठाम आहे. शिवसेनेच्या आक्रमक चभूमिकेमुळे संघकार्याल आणि दिल्लीतील केंद्राच्या नेतृत्वालाही यश आलं नाही अशीच चर्चा सुरू आहे. यामुळे सर्वांच्या नजरा पुढील घडामोडीकडे लागल्या आहेत.