भारतीय हवामान शास्त्र विभागाने रविवारीही ठाणे, रायगड आणि पालघर या जिल्ह्यांचा रेड अलर्ट कायम ठेवला आहे. रविवारी या तिन्ही जिल्ह्यांत अतिवृष्टी होईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. मुंबईत मात्र मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. याव्यतिरिक्त नाशिक, पुणे आणि सातारा जिल्ह्यातही अतिवृष्टी होईल, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
४ ऑगस्ट रोजी कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी अतिवृष्टी होईल. विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल. ५ ऑगस्ट रोजी कोकण, गोव्यात काही ठिकाणी मुसळधार तर तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडेल. मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडेल.