राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा निकाल जाहीर करण्यात आलाय. यंदाच्या निकालात कोकण विभागाने पुन्हा एकदा बाजी मारली आहे. कोकणचा निकाल ९४ टक्के लागला आहे. तर नाशिक विभागाचा निकाल सर्वात कमी ८६.१३ टक्के लागला आहे. राज्यात पुन्हा एकदा मुलींनी बाजी मारली आहे. दरम्यान, मागील वर्षीच्या तुलनेत यंदा उत्तीर्ण विध्याथ्यांच्या संख्येत १ टक्क्यांनी कमी झाली आहे. गेल्या वर्षी बारावीचा निकाल ८९.५० टक्के इतका होता तर यंदाचा ८८.४१ टक्के इतका लागला आहे.
एकूण १४ लाख ४५ हजार १३२ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी १२ लाख ५२ हजार ८१७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यात मुलांची टक्केवारी ८५.२३ टक्के असून मुलींची सर्वाधिक टक्केवारी ९२.३६ टक्के आहे. तर अपंग विद्यार्थ्यांची टक्केवारी ९१.७८ आहे. तर आज दुपारी १ वाजता अधिकृतपणे संपूर्ण निकाल पाहता येणार आहे.