दुध उत्पादनात महाराष्ट्र नंबर वन असेल-दुग्धविकासमंत्री जानकर

- Advertisement -

मुंबई दुध उत्पादनात महाराष्ट्राचा क्रमांक पूर्वी पहिला होता. परंतु सध्या बारावा आहे.एक वर्षात राज्याचा क्रमांक पुन्हा पहिला असेल असा दावा राज्याचे   पशूसंवर्धन  व  दूग्धविकासमंत्री महादेव जानकर यांनी आज येथे केला.आरे-ए ला पुन्हा सर्वोच्च प्रतिष्ठा व दर्जा प्राप्त करून देऊ असा निर्धारही त्यांनी व्यक्त केला. मंत्रालय पत्रकार कक्षात जानकर हे पत्रकारांशी बोलत होते.

राज्यात दररोज दीड कोटी रूपये किंमतीचे दूध, अंडी, व मत्स्यबीज बाहेरील राज्यातून येते. त्यावर मात करून राज्यात त्यांचे उत्पादन वाढविण्यावर शासनाचा भर राहील असे त्यांनी स्पष्ट  केले. आपल्या मंत्रिपदाच्या कार्यकालात केंद्र सरकारकडून संरक्षण वगृह विभागासाठी दूध व अंडी पुरविण्याची परवानगी दिली आहे व महाराष्ट्र हे अशी परवानगी मिळालेले एकमेव राज्य आहे, असेही त्यांनी सांगितले.

राज्यातील  दूध भेसळ रोखण्यासाठी सरकारची जबाबदारी आहेच पण ग्राहक म्हणून शहरी लोकांचीही जबाबदारी आहे. घरच्याघरी ग्राहकांना दूधभेसळ तपासता यावी म्हणून शाासनातर्फे  तपासणी पेपरचा पुरवठा केला जाईल.भेसळ करणा-यांवर आपण आजवर शंभरहून अधिक धाडी घातल्या अशीही माहिती त्यांनी दिली.जनावरांना  उपचार व चिकित्सा लवकर मिळावी 349 वाहने उपलब्ध करू  कोणत्याही भागातून जिल्ह्यातून मेसेज येताच वाड्या वस्तीवरही पशूवैद्यकासह वाहन तेथे पोहचेल. टाटा समूहाच्या  आर्थिक साहाय्यतून नवी मुंबईत कळंबोली येथे जागतिक दर्जाचे पशूचिकित्सालय उभे करण्यात येणार आहे, असेही जानकर यांनी सांगितले.त्याचवेळी राज्यात मत्स्यउत्पादनास अधिकाधिक चालना मिळावी यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याचा निर्धार व्यक्त करतानाच,मत्स्यबीजाचे उत्पादन येथेच व्हावे या हेतूने कोकणातील रत्नागिरी येथे विशेष बीज केंद्र उभारण्याच्या आपल्या कल्पनेस मुख्य मुख्यमंत्र्यांनीही मान्यता दिली असून त्याचे काम युध्दपातळीवर पूर्ण करण्यात येईल असाही दावा जानकर यांनी यावेळी बोलताना केला.

- Advertisement -
- Advertisement -