जालना : भाजपचे केंद्रीय राज्य मंत्री रावसाहेब दानवे यांच्या जालना लोकसभा मतदारसंघात नागरिकत्व सुधारणा बिलाविरोधात (CAA) आणि राष्ट्रीय नागरिकत्व सुधारणा कायदा (NRC) विरोधात मराठवाड्यातील जालना शहरामध्ये नागरिकांच्या वतीने आज सोमवारी मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी हजारो नागरिकांनी या मोर्चामध्ये सहभाग नोंदवला होता.
जालन्यात नागरिकांनी जुन्या नगरपरिषदेपासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढला होता. यावेळी हजारो नागरिक सहभागी झाले होते. नागरिकांच्या वतीने जिल्हाधिका-यांना निवेदन सादर करण्यात आले. यामध्ये सर्वपक्षाचे नेते, तसेच विविध संघटनांचे नेते, कार्यकर्ते उपस्थित होते. देशभरात विविध ठिकाणी आंदोलन सुरु आहेत. काही ठिकाणी हिंसक घटना घडल्या आहेत. दररोज देशात विविध ठिकाणी आंदोलन सुरु असून हा कायदा संविधान विरोधी असून तो रद्द करा अशी मागणी करण्यात येत आहेत.
नागरिकांच्या हातात होते तिरंगे झेंडे…….
जालना शहरात निघालेल्या मोर्च्यामध्ये केंद्र सरकार विरोधात जोरदार घोषणा देण्यात आल्या. विशेष म्हणजे रॅलीच्या वेळी सर्व नागरिकांच्या हातात तिरंगे झेंडे होते. संविधान वाचवा देश वाचवा अशाही घोषणा यावेळी देण्यात आल्या.