निलंगा शहराच्या इतिहासात प्रथमच विश्वशांतीसाठी ,जनकल्याणासाठी ,पर्जन्यासाठी भव्य महायज्ञाला आयोजीत करण्यात आला. महाराष्ट्राचे अन्न व नागरी पुरवठा, ग्राहक संरक्षण, कौशल्य विकास, माजी सैनिक कल्याण मंत्री व लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर व भा.ज.पा. चे युवा नेते अरविंद पाटील निलंगेकर यांच्या पुढाकाराने निलंगा शहरात दि 9/3/2019 पर्यंत सतत सात दिवस वेद पठन ,पुजा इत्यादी माध्यमातून अंखड महायज्ञ चालू राहाणार आहे. अशी माहीती युवा नेते श्री अरविंद भैया पाटील यांनी आज कासारशिरसी येथे दिली आहे. यावेळी जिल्हा परिषद कृषी सभापती श्री बंजरंग दादा जाधव व अनेक पदाधिकारी मान्यवर उपस्थित होते.