मुंबई : शिवसेनेकडून आज सत्ता स्थापण्याचा दावा राज्यपालांकडून दाखल करण्यात आला. पक्षनेता निवडीसाठी मंगळवारी शिवसेना,राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस अशा महाशिवआघाडीची बैठक होणार आहेत. तब्बल 20 वर्षानंतर शिवसेनेला मुख्यमंत्रीपद मिळणार आहे. यामुळे शिवसेनेमध्ये चैतन्य पसरलं आहे.
विधानसभेच्या निकालानंतर शिवसेना भाजपात सत्तासंघर्षावरून वाद झाला होता. त्यामुळे शिवसेनेनं भाजपापासून काडीमोड घेतलं. काडीमोड घेतल्यानंतर शिवसेना काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठिंब्यावर सरकार स्थापन करत आहेत. त्यामुळे महाराष्ट्रात तिन्ही पक्षांची महाशिवआघाडी अस्तित्वात आली आहे.
शिवसेनेचाच मुख्यमंत्री होणार यावर शिक्कामोर्तब झालं आहे. त्यामुळे पक्षनेतासाठी मंगळवारी बैठक होणार आहे. त्यानंतर शपथविधीची तारीख जाहीर होण्याची शक्यता आहे.