Placeholder canvas
Thursday, April 25, 2024
Homeमहाराष्ट्रPhone Tapping : रश्मी शुक्लांबाबतचा अहवाल आलाय, आता पुढे काय होतं ते...

Phone Tapping : रश्मी शुक्लांबाबतचा अहवाल आलाय, आता पुढे काय होतं ते बघा

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचा सूचक इशारा

congress-ministers-mlas-including-nana-patole-will-reach-vidhan-bhavan-bicycles maharashtra financial budget
congress-ministers-mlas-including-nana-patole-will-reach-vidhan-bhavan-bicycles
maharashtra financial budget

मुंबई: आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांच्या कामकाजाचा अहवाल मुख्य सचिवांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे दिला आहे. आता पुढे काय होतं ते बघा, असा सूचक इशारा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिला आहे. त्यामुळे रश्मी शुक्लांवर सरकार कारवाई करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

नाना पटोले आणि काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी पटोले यांनी हा सूचक इशारा दिला. यावेळी त्यांनी केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांचा निषेधही नोंदवला. अधिकारी अधिकारी असतात. त्यांनी जनतेसाठी काम करावं की एखाद्या पक्षासाठी हे त्यांनी ठरवावं. अधिकार्‍यांनी कुणाची कठपुतळी होऊ नये, त्यांनी जनतेसाठी काम करावं, असं सांगतानाच काँग्रेसने अधिकार्‍यांचा कधीच असा वापर केला नाही, असं पटोले यांनी सांगितलं.

आगामी काळात भाजपची कोंडी करणार?

यावेळी पटोले यांनी अप्रत्यक्षपणे भाजपला इशारेही दिले. न्याायमूर्ती लोया प्रकरण आहे. इतर प्रकरणेही आहेत. त्यावरही आता कारवाई होईल, असं सांगत पटोले यांनी आगामी काळात भाजपची कोंडी करणार असल्याचे संकेत दिले.

राऊत कुणाचे प्रवक्ते?

यावेळी त्यांनी पुन्हा एकदा शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावर टीका केली. शिवसेना हा यूपीएचा घटक पक्ष नाही. त्यामुळे यूपीएने कुणाला पाठिंबा द्यावा हे ते ठरवू शकत नाही. त्यांनी सल्ले देऊ नयेत असं सांगतानाच संजय राऊत कोणाचे प्रवक्ते आहेत ते आधी त्यांनी जाहीर करावं, मग आम्ही त्यावर बोलू, असंही ते म्हणाले.

यावेळी पृथ्वीराज चव्हाण यांनी मोदी सरकारवर दोन आरोप केले. मोदी सरकारने तीन कृषी कायदे रद्द करावेत, अशी आमची मागणी आहे. केंद्र सरकारने विरोधकांशी चर्चा करून नवीन कायदे करावेत. सध्या हे कायदे दीड वर्षासाठी स्थगिती केले आहेत.

त्यामुळे नवीन कायदे तयार करण्यात यावेत. परंतु मोदी सरकारला कृषी अर्थव्यवस्था मोठ्या उद्योगपतींच्या घशात घालायची असल्याने सरकार हे करणार नाही, असा आरोप पृथ्वीराज चव्हाण यांनी केला. तसेच कोरोना काळात सरकारला झालेला तोटा भरून काढण्यासाठी सरकार पेट्रोल डिझेलवर भरमसाठ कर आकारत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्चा तेलाच्या किंमती कमी झाल्या आहेत, मात्र आपल्या देशात किंमती कमी होत नाहीत, अशी टीकाही त्यांनी केली.

 

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments