Placeholder canvas
Saturday, April 20, 2024
Homeमहाराष्ट्रमनसेच्या गुंडांनी पुन्हा मार खाल्ला : निरुपम

मनसेच्या गुंडांनी पुन्हा मार खाल्ला : निरुपम

मुंबई : “गरीब फेरीवाल्यांच्या पोटावर मनसेचे गुंड नेहमी लाथ मारतील आणि तेही पोलिसांच्या समोर तर असंच उत्तर दिलं जाईल. म्हणून मनसेने गुंडगिरी सोडून द्यावी,” असं मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी ट्वीटव्दारे सोमवारी म्हटलं आहे.

विक्रोळीत मनसे उपविभागप्रमुख विश्वजीत ढोलम यांच्यासह ४ कार्यकर्त्यांना झालेल्या मारहाणीनंतर संजय निरुपम यांनी ट्वीट करुन पुन्हा मनसेच्या गुंडग र्दी विरोधात आवाज उठविला. यामुळे फेरीवाला विरुध्द मनसे असा संघर्ष सुरुच राहणार असल्याचे सध्याचे वातावरण आहे.

विक्रोळीत मनसे कार्यकर्त्यांना मारहाण
दुकानदारांनी मराठी पाट्या लावाव्यात, यासाठी मनसे पदाधिकाऱ्यांकडून रविवारी दुकान मालकांना निवेदन दिलं जातं होतं. त्याचवेळी स्थानिक दुकानदार आणि काँग्रेस कार्यकर्ता अब्दुल अन्सारी आणि त्याच्या १५ ते २० साथीदारांनी मारहाण सुरु केली. यात मनसेचे विभागप्रमुख विश्वजित ढोलम आणि इतर ४ जण जखमी झाले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments