मुंबई: भाजपच्या शिष्टमंडळाने आज राज्यपालांकडे सत्तास्थापनेचा दावा दाखल केला नाही. सरकार स्थापन करण्यास उशीर होत आहे. या सर्व परिस्थितीवर कायदेशीर बाबी समजून घेण्यासाठी आम्ही राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे गेलो होतो, असं भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील माध्यमांशी बोलताना सांगितलं.
आज गुरुवारी भाजपच्या शिष्टमंडळाने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. त्यावेळी भाजपप्रदेशाध्यक्ष चंद्राकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार, आशिष शेलार, सुधीर महाजन उपस्थितीत होते. आज सकाळीच राज्यपालांच्या भेटीआधीच सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले होते की, भाजपला अल्पमतातील नव्हे तर स्थिर सरकार द्याचे आहेत. त्या दृष्टीकोनातून आम्ही विचार करीत आहोत. शिवसेनेला सोबत घेऊनच सरकार स्थापन करण्याची आमची इच्छा आहे असे मुनगंटीवार यांनी स्पष्ट केले.