मुंबई : शिवसेना भाजप युती तुटली तेव्हापासून दोन्ही पक्षांमध्ये आरोप प्रत्यारोप जोरदार सुरु आहेत. सत्तेसाठी शिवसेनेने हिंदुत्वाच्या तत्वाला मुठमाती दिली. अशी टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली होती. त्याला शिवसेनेचे विधान परिषद सदस्य अंबादास दानवे यांनी प्रत्युत्तर दिले, भाजपला सत्तेचा माज चढला असून त्यांनी जीभ आवरावी, शिवसैनिकांच्या संयमाचा अंत पाहू नये. असा इशारा भाजप नेत्यांना दिला आहे.
दानवे म्हणाले, भाजपच्या हातातून महाराष्ट्र गेला. झारखंड, मध्यप्रदेश, राजस्थान आणि आता दिल्लीत तोंडावर आपटल्यामुळे शिवसेनेवर खालच्या पातळीवर निंदानालस्ती करण्याचे प्रकार भाजपचे नेते करीत आहे.
मागील पाच वर्षात महाराष्ट्रात व देशात सरकार असतानाही शिवसेना खासदार चंद्रकांत खैरे यांनी लोकसभेत मागणी केली. फडणवीस सरकारकडेही नामांतराची मागणी केली. सरकारने ही मागणी पूर्ण केली. त्यामुळे सत्ता गेल्यावर संभाजीनगरचा विषय उकरून काढणे हा ढोंगीपणा आहे. असा आरोप आमदार अंबादास दानवे यांनी केला आहे.