मुंबई: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं आहे. राजकीय पक्षही तयारीला लागले आहे. 21 ऑक्टोबरला मतदान होणार आहे. निवडणुकीसाठी आज 27 सप्टेंबर पासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरूवात झाली आहे. उमेदवारांना 4 ऑक्टोबर पर्यंत आपला उमेदवारी अर्ज भरण्याची मुभा आहे.
महाराष्ट्रात 288 विधानसभास मतदारसंघात 21 ऑक्टोबरला मतदान होणार आहे. तर 24 ऑक्टोबरला मतमोजणी होईल. यासाठी आजपासून अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. 7 ऑक्टोबर पर्यंत निवडणूक आयोगाच्या छाननीनंतर अर्ज मागे घेता येतील.
निवडणूकांच्या तारखा जाहीर झाल्यानंतर सारेच राजकीय पक्ष कामाला लागले आहेत. 2014 च्या विधानसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाला सर्वाधिक 122 जागा, शिवसेनेस 63, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसला 42 तर राष्ट्रवादी काँग्रेसला 41 जागा मिळाल्या होत्या. सध्या कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षाकडून उमेदवारी जाहीर करण्याला सुरूवात झाली आहे. मात्र सत्ते असलेल्या शिवसेना – भाजपा युतीने अद्याप जागावाटप आणि युतीची अधिकृत घोषणा केली नाही.
महाराष्ट्रात 8 कोटी 94 लाख मतदार निवडणूक प्रक्रियेत मतदान करतील. राज्यात सध्या आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. त्यामुळे निवणूक आयोगाच्या सर्व यंत्रणा तयार झाल्या आहेत.