मुंबई : भाजप-शिवसेनेतील सत्तास्थापनेच्या वादात काँग्रेसने उडी घेतली आहे. भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी शिवसेनेला पाठिंबा देण्याचे स्पष्ट संकेत काँग्रेसने दिले आहेत. शिवसेनेकडून पाठिंब्याबाबत प्रस्ताव आल्यास हा प्रस्ताव पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांच्याकडे घेऊन आम्ही जाऊ, असं वक्तव्य माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी केले आहे.
भाजप – शिवसेना युतीला जनतेने कौल दिला. आठ दिवस उलटले तरी सुध्दा त्यांनी सरकार स्थापण्यासाठी पुढाकार घेतला नाही. शिवसेनेने पाठिंब्यासाठी आमच्याकडे प्रस्ताव दिला तर निश्चितच त्याचा विचार करण्यात येईल. हा प्रस्ताव हायकमांडपुढे मांडून त्यावर अंतिम निर्णय घेतला जाईल’, असे नमूद करत पृथ्वीराज चव्हाण यांनी शिवसेनेला पाठिंबा देण्याचे संकेत पुन्हा दिले आहेत. यामुळे शिवसेना काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.