मुंबई : भाजपाने शिवसेनेला फसवलं आहे असा आरोप माजी मुख्यमंत्री आमदार अशोक चव्हाण यांनी केला आहे. तसंच आमची सध्याची भूमिका ही वेट अँड वॉचची आहे, असंही चव्हाण यांनी म्हटलं आहे. त्यामुळे काँग्रेस शिवसेना पाठिंबा देण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
भाजपा आणि शिवसेनेचं सत्तास्थापनेचं काही ठरत नसल्याने काँग्रेसचे नेते सोनिया गांधी यांच्या भेटीसाठी दिल्लीत गेले आहेत. भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी शिवसेनेला काँग्रेसने पाठिंबा द्यावा अशी भूमिका काँग्रेसने घेतली आहे. त्याबाबत चर्चेसाठीच अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह काँग्रेस नेत्यांचं शिष्टमंडळ सोनिया गांधींना भेटण्यासाठी गेले आहेत. दरम्यान भाजपाने शिवसेनेला फसवलं आहे असा आरोप अशोक चव्हाण यांनी केला आहे. तसंच आमची सध्याची भूमिका ही वेट अँड वॉचची आहे असंही त्यांनी म्हटलं आहे. यामुळे काँग्रेसच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.