दरम्यान नवी मुंबई परिसरातही पावसाची संततधार कायम आहे. ऐरोली, जुईनगर, वाशी, पनवेल, नेरुळ, खारघर, कामोठे परिसरात मोठ्या प्रमाणावर पाऊस पडत आहे. तर, ठाणे जिल्ह्यातही ठाणे, कल्याण, डोंबिवली, टिटवाळा आदी ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पाऊस पडत आहे.
नागरिकांना सतर्कतेचा इशारा, शाळांना सुट्ट्या
पावसाची संततधार कोसळत असल्यामुळे शासनाने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. तर, संभाव्य धोक्याची शक्यता विचारात घेऊन सावधानता म्हणून शाळांना सुट्टी दिली आहे. तसेच, नागरिकांनाही सतर्कतेचा इशारा देताना कामाशिवाय घराबाहेर पडून नका. जर अगदीच आवश्यक असेल तरच घराबाहेर पडा असे म्हटले आहे.