Placeholder canvas
Saturday, April 20, 2024
Homeमहाराष्ट्रमुंबईसंभाजी भिडेंना मोदी सरकारची जावयासारखी वागणूक का?- प्रकाश आंबेडकर

संभाजी भिडेंना मोदी सरकारची जावयासारखी वागणूक का?- प्रकाश आंबेडकर

Elgar Morcha

मुंबई : कोरेगाव भीमा हिंसाचारप्रकरणी संभाजी भिडे यांच्या अटकेच्या मागणीसाठी भारिप-बहुजन महासंघानं एल्गार मोर्चाचं आयोजन केले आहे. जिजामाता उद्यान ते विधान भवन दरम्यान मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. मात्र, भारिपच्या एल्गार मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. तर दुसरीकडेआझाद मैदानावरील आंदोलनास पोलिसांकडून मंजुरी देण्यात आली आहे. त्यानुसार आझाद मैदानावर आंदोलक जमले. सीएसएमटी स्थानकात आंदोलकांची गर्दी झाली आहे.  पोलीस आंदोलनकर्त्यांना पांगवण्याचा प्रयत्न करत आहेत.

संभाजी ब्रिगेडचा मोर्चाला पाठिंबा
संभाजी भिडे यांच्या अटकेच्या मागणीसाठी निघणाऱ्या एल्गार मोर्चाला संभाजी ब्रिगेडने आपला पाठिंबा जाहीर केला आहे. या मोर्चात ब्रिगेड आपल्या कार्यकर्त्यांसह संपूर्ण तयारीनिशी आणि ताकदीनिशी उतरणार असल्याचे, ब्रिगेडचे पुणे अध्यक्ष संभाजी शिंदे यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments