महत्वाचे
१. ना.गिरीश महाजन यांनी घेतली मोर्चेकऱ्यांची भेट
२. कर्जमाफी इतर मागण्यांसाठी घेराव
३. सर्वच राजकीय पक्षांचा पाठिंबा
मुंबई: अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने विधानभवनावर काढण्यात आलेला मोर्चा आज मुंबापुरीत दाखल झाला आहे. हा मोर्चा सोमवारी विधानभवनाला घेराव घालणार आहे. मोर्चाला भाजप इतर सर्वच राजकीय पक्षांनी पाठिंबा दिला आहे. किसान सभेचे हे लाल वादळ आज सोमय्या मैदानावर मुक्कामी राहणार आहे.
नाशिकहुन ६ मार्चला निघालेल्या या लाल वादळात आतापर्यंत नाशिक, ठाणे, अहमदनगर, पुणे तसेच राज्याच्या अन्य भागातून तब्बल ३५ ते ४० हजारांवर शेतकरी सहभागी झाले आहेत. हे मोर्चेकरी आज मुंबईमध्ये दाखल झाले असून सोमवारी विधानभवनावर धडक देऊन सरकारच्या उरात धडकी भरवणार असल्याची चर्चा सुरू आहे.