मुंबई : मुंबईचा बहुचर्चीत भाग म्हणून ओळखला जाणारा कामाठीपुरा येथील इमारतींचा समूह पुनर्विकासाचा प्रस्ताव तयार करुन सर्वेक्षणाला सुरुवात करावी, असे निर्देश गृहनिर्माण मंत्री डॉ.जितेंद्र आव्हाड यांनी मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळास दिले आहेत.
कामाठीपु-यातील सुमारे ४० एकर जमिनीवर वसलेल्या एक हजार इमारतींपैकी ७०० इमारती आणि चाळी १०० वर्ष जुन्या असून त्या धोकादायक बनल्या आहेत. ५० ते १८० चौरस फुटाच्या खोलीत येथील रहिवासी धोकादायक अवस्थेत राहत असल्याने हा पुनर्विकास आव्हानात्मक ठरणार आहे. विशेष म्हणजे मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाने सैफी-बु-हाणी अपलिफ्टमेन्ट ट्रस्ट च्या धर्तीवर कामाठीपुरा समूह पुनर्विकासाचा प्रस्ताव तयार करावा, असे निर्देश आव्हाड यांनी दिले आहे.