मुंबई : जोगेश्वरीमध्ये नामांकित कंपन्यांच्या दूध पिशव्यांमध्ये पाणी भरुन त्याची विक्री करणार्या टोळीला पोलिसांच्या गुन्हे शाखेने अटक केली आहे. या आरोपींकडून पोलिसांनी 12 हजारांचे भेसळयुक्त दूध हस्तगत केले आहे.
गेल्या काही दिवसांपासून जोगेश्वरीच्या आदर्शनगर परिसरारात मोठ्या प्रमाणात दुधाची भेसळ होत असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली होती. त्यानुसार गुन्हे शाखेच्या अधिकार्यांनी मंगळवारी पहाटे 5 वाजता या ठिकाणी छापा मारला . यावेळी पोलिसांनी 233 लीटर भेसळयुक्त दूध ताब्यात घेतले. याठिकाणी नामांकित कंपन्यांच्या दुधामध्ये दुषित पाणी घालून या दुधाची विक्री केली जात होती. त्यानुसार पोलिसांनी ही भेसळ करणार्या श्रीनिवास नालमादी (41), जानया बट्टू (42 ) या दोघांना अटक केली आहे.