मुंबई : मनसेचं इंजिन कल्याण ग्रामीणमध्ये धावलं. मनसेचे कल्याण ग्रामीणमध्ये प्रमोद उर्फ राजू पाटील हे महाराष्ट्रातून एकमेव उमेदवार निवडूण आले. राजू पाटलांनी शिवसेनेचे रमेश म्हात्रेंचं पराभव केलं.
मनसेने जवळपास 110 जागांवर आपले उमेदवार दिले होते. विशेष म्हणजे राज ठाकरेंनी सक्षम विरोधी पक्ष म्हणून आमच्या उमेदवारांना मतं द्या असाच प्रचार केला होता. परंतु, मतदारांनी मनसेला स्पष्ट नाकारलं असल्याचे स्पष्ट झाले आहे.
राज ठाकरे यांच्या नेतृत्वात 2009 मधील विधानसभा निवडणुकीत मनसेचे 13 आमदार निवडून आले होते. 2014 मध्ये मनसेचा केवळ 1 आमदार निवडून आला होता. आता पुन्हा मतदारांनी मनसेचं 1 उमेदवार निवडूण दिला.