मुंबई: युतीमध्ये सत्तास्थापनेचा 50- 50 चा फॉर्म्यूला ठरला होता. परंतु, भाजपने असं काहीच ठरलं नव्हतं असं सांगून आमचे पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांना खोट दाखवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे मी मंत्रीपदाचा राजीनामा दिला. एनडीएतून बाहेर पडलो असं शिवसेनेचं केंद्रीय मंत्री अरविंद सावंत यांनी दिल्लीत सांगितलं.
शिवसेना एनडीएतून बाहेर पडली आहे. शिवसेनेचे 18 खासदार आहेत. त्यामुळे भाजपचा एक मित्र पक्ष पुन्हा कमी झाला आहे. भाजपच्या अहंकारापणामुळे शिवसेनेला ही पाऊले उचलावी लागली आहे. असं शिवसेना नेत्यांचं म्हणणं आहे.
जिथं विश्वासहार्ताच नाही तेथे काम कसं करायचा असा सवाल सावंत यांनी उपस्थित केला. त्यामुळे पुढे काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. काँग्रेसने शिवसेनेला एनडीएतून बाहेर पडण्याची अट घालतली होती. त्यामुळे शिवसेनेनं ती मान्य करत एनडीएशी फारकत घेतली. सावंत यांनी पंतप्रधान कार्यालयात आपला मंत्रीपदाचा राजीनामा सोपवीला. असं सावंत यांनी आज दिल्लीत जाहीर केलं.