मुंबई: शिवसेना- भाजपामधील सत्तेचा पेच कायम असून शिवसेना मुख्यमंत्रीपदावर कायम आहेत. शिवसेनेने सर्व आमदार आणि खासदारांची बैठक शिवसेना भवनावर बोलावली आहे. शिवसेना काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
पंधरा दिवस उलटूनही सत्तास्थापनेचा पेच कायम आहे. राज्यपालांनी सर्वात मोठा पक्ष असलेल्या भाजपला सत्तास्थापनेसाठी बोलावले नाही. त्यामुळे पेच आणखीनच निर्माण झाला आहे. दिल्लीच्या इशा-यावरून राज्यपाल राष्ट्रपती राजवट लागू करण्याचा डाव आखत आहेत. असा आरोप शिवसेनेने केला आहे. भाजपाकडून शिवसेना आमदारांना फोडण्याचा प्रयत्न सुरु आहे. त्यामुळे शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.
शिवसेना भवनात आज होणा-या बैठकीला विशेष महत्व प्राप्त झाले आहे. शिवसेनेला सत्तेत समान वाटा मिळत नसल्यामुळे शिवसेना आपल्या भूमिकेवर ठाम आहे. त्यामुळे शिवसेनेचं पुढील पाऊल काय असणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.