मुंबई : अडीच वर्षांच्या मुख्यमंत्रीपदासह सत्तेतल्या समान वाटपावर शिवसेना ठाम आहे. आमदार फुटू नयेत यासाठी शिवसेनेकडून आमदारांना गुरुवारी रंगशारदा हॉटेलमध्ये ठेवण्यात आले होते. आज शुक्रवारी सर्व आमदारांना मालाड येथे एका हॉटेलमध्ये हलवण्याची शक्यता आहे.
‘ जे ठरलंय तेच व्हावं. आमची बाकी काही अपेक्षा नाही,’ अशी आपली भूमिका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केली आहे. शिवसेना आमदारांना फोडण्याची भीती शिवसेनेला आहे. तसेच काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसनेही भाजपाकडून आमदार फोडण्याची शक्यता आहे. त्यामुळे तिन्ही पक्षांकडून आमदारांना सुरक्षित ठेवले जाणार आहे. यामुळे शिवसेनेच्या हालचालींकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.