मुंबई : युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे वरळीमध्ये विजयी झाले. आता आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्री पदावर बसवण्यासाठी मंथन सुरु असून, कार्यकर्त्यांनी भावी मुख्यमंत्री अशा आशयाचे बॅनर वरळीत ठिकठिकाणी लावण्यात आले आहे.
शिवसेना भाजपासोबतच्या फॉर्म्युल्यावर ठाम आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी गुरुवारीच पत्रकार परिदेतून भाजपला एका प्रकारे इशारा देऊन टाकला. तसेच खासदार संजय राऊत यांनीही माध्यमांशी बोलताना ज्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या तो भाजपला इशारा होता. त्यामुळे भाजपा समोरील अडचणी वाढणार आहे.
‘हीच ती वेळ’ ही टॅग लाईन वापरून शिवसेनेने संपूर्ण विधानसभेचं कॅम्पेनींग केलं होतं. तसेच शिवसेनेनेही मंत्रालयावर भगवा फडकवू असे आधीच जाहीर केलं होतं. त्यामुळे शिवसेना मुख्यंमत्रीपदासाठी आक्रमक झाली आहे.