मुंबई : झारखंडमध्ये भाजपचे पानिपत झाले. जेएमएम आणि काँग्रेस यांच्या आघाडीने भाजपकडून सत्ता हिसकावून घेतली. भाजपला महाराष्ट्रानंतर झारखंडमध्ये हा दुसरा धक्का बसला आहे. राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी झारखंडमधल्या निकालांवरून भाजपवर निशाणा साधलाय महाराष्ट्राने केलेली ही सुरवात झारखंड पासून अन्य राज्यात देखील दिसेल.
महाराष्ट्रात भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने एकत्र येऊन सत्तेत आले. हाच प्रयोग झारखंडमध्येही करण्यात आला. भाजपला सत्तेपासून रोखण्यासाठी तेथे काँग्रेस, झारखंड मुक्ती मोर्चा, आरजेडीसह इतर स्थानिक पक्ष एकत्र आले आहेत. अन्य राज्यात ही पुढे असेच चित्र दिसेल असे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी सांगितले.
झारखंड निवडणुकांमध्ये काॅंगेस व मित्रपक्ष आघाडीवर असल्याची बातमी आहे.जसे महाराष्ट्रात चित्र बदललं त्याचप्रमाणे झारखंडचे चित्र असेल. कुठेतरी महाराष्ट्राने केलेली ही सुरवात झारखंड पासून अन्य राज्यात देखील दिसेल. झारखंडमधील काॅंग्रेस व मित्रपक्षाच्या कार्यकर्त्यांचे हार्दिक अभिनंदन. pic.twitter.com/F5syEYoRa8
— Rohit Pawar (@RRPSpeaks) December 23, 2019
भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी विरोधक एकत्र आले आहेत. भविष्यात भाजपला रोखण्यासाठी विरोधक महाआघाडी करुन निवडणुका लढतील हे जवळपास निश्चित आहे. त्यामुळे भाजपला विरोधकांचा सामना करावा लागणार आहे. हेच आमदार रोहित पवार यांनी ट्विटच्या माध्यामातून सूचित केले आहे.