Placeholder canvas
Saturday, April 20, 2024
Homeमहाराष्ट्रमुंबईउध्दव ठाकरेंनी अब्दुल सत्तार – चंद्रकांत खैरेंमध्ये मनोमिलन घडविले

उध्दव ठाकरेंनी अब्दुल सत्तार – चंद्रकांत खैरेंमध्ये मनोमिलन घडविले

Abdul Sattarमुंबई : औरंगाबाद जि.प.निवडणुकीच्या जि.प. अध्यक्ष, उपाध्यक्षावरून राज्यमंत्री अब्दुल सत्तार आणि शिवसेना उपनेते खासदार चंद्रकांत खैरे यांचा वाद सुरु होता. वाद मातोश्रीवर पोहोचला होता. आज सोमवारी शिवसेना पक्षप्रमुख, मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये या वादावर चर्चा झाली. त्यानंतर सत्तार आणि खैरेंमधील वाद मिटवला. दोन्ही नेत्यांचे मनोमिलन घडवून आणले.

मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, ना. एकनाथ शिंदे, राज्यमंत्री अब्दुल सत्तार, आमदार अंबादास दानवे, शिवसेना उपनेते माजी खासदार चंद्रकांत खैरे यांच्यामध्ये मातोश्रीवर बैठक झाली. या बैठकीमध्ये मुख्यमंत्र्यांनी सर्व माहिती घेतली. राज्यमंत्री सत्तार आणि माजी खासदार चंद्रकांत खैरे यांना कामाला लागा. पक्षमजबूत करण्यासाठी एकदिलाने काम करण्याच्या सूचना केल्या. जवळपास दीड तास चाललेल्या बैठकीमध्ये मराठवाडयातील पक्षाच्या बाबतीतही चर्चा झाली.

आमच्यातील वाद मिटलेला आहे – चंद्रकांत खैरे

उध्दव ठाकरे यांच्यासमोर आमच्यातील वाद मिटलेला आहे.आता आम्ही पक्षशिस्तीनुसार काम करु. आगामी निवडणुकांसाठी हातात हात घेऊन काम करु, असे चंद्रकांत खैरे यांनी सांगितले.

पक्षाच्या आदेशाचं पालन होईल – राज्यमंत्री सत्तार

शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे आणि माझ्यात गैरसमजातून काही गोष्टी झाल्या. मात्र, आता पक्षाच्या शिस्तीप्रमाणे आणि पक्षप्रमुखांच्या आदेशानुसारच काम होईल. पक्षाच्या आदेशाचं पालन होईल. पुढे कधीही असा वाद होणार नाही.

दोन दिवसात कायं घडलं….

शिवसेनेचे राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी जि.प. निवडणुकीत महाआघाडीच्या उमेदवाराविरोधात काम केले. त्यामुळे शिवसेनेचे माजी खासदार उपनेते चंद्रकांत खैरे यांनी राज्यमंत्री सत्तार यांच्यावर सडकून टीका केली होती. या सर्व वादानंतर (रविवार ५ जानेवारी ) रोजी राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी मातोश्री निवासस्थानी शिवसेना पक्षप्रमुख, मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंची भेट घेतली. भेटीदरम्यान संपूर्ण प्रकरणाची व माझ्या राजीनाम्याची पूडी कुणी सोडली याबद्द मी सविस्तर माहिती उध्दव ठाकरेंना दिली. अशी माहिती राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी माध्यमांशी बोलताना दिली.

राज्यमंत्री सत्तार आणि मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यात २० मिनिटे चर्चा झाली. मी नाराज नाही. काम करत राहणार असं सत्तार यांनी उध्दव ठाकरे यांनी सांगितले. तसेच सोमवारी सायंकाळी ५ : ३० वाजता पुन्हा आम्ही मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंच्या भेटीसाठी येणार आहोत. अशी माहिती राज्यमंत्री सत्तार यांनी माध्यमांशी बोलताना दिली.

औरंगाबाद जि.प.मध्ये शनिवारी अध्यक्ष, उपाध्यक्षपदाची निवडणूक झाली. यामध्ये महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या विरोधात राज्यमंत्री सत्तार यांनी शिवसेनेच्या विद्यान जि.प. अध्यक्षा देवयानी डोणगावकर यांना पुन्हा मैदानात उतरवले होते. भाजप व सत्तार समर्थकांच्या भरवशावर वाद निर्माण झाला होता.  काँग्रेसच्या मिना शेळके व शिवसेनेच्या बंडखोर देवयानी डोणगावकर यांना प्रत्येकी ३० मते मिळाल्याने चिठ्ठी काढण्यात आली होती. यात काँग्रेसच्या शेळके विजयी ठरल्या. उपाध्यक्षासाठी भाजपचे लहानू गायकवाड व शिवसेनेच्या शुभांगी काजे यांच्यातील लढतीत महाविकास आघाडीची दोन मते फुटल्याने भाजपचा विजय झाला. यामुळे शिवसेनेचे माजी खासदार यांनी राज्यमंत्री सत्तार हे गद्दार आहेत. त्यांना मातोश्रीची पायरी चढू देणार नाही. असं विधान केलं होतं. त्यामुळे शिवसेनेमध्ये दुफळी असल्याचे समोर आले होते. त्यानंतर राज्यमंत्री सत्तार यांनी माझं रिमोट कंट्रोल मातोश्रीवर आहे. त्यामुळे मला काय बोलायचं मी मातोश्रीवर बोलणार असं सांगितलं होतं.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments