माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचा महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष आज भाजपात विलिन होणार आहे. गेल्या कित्येक महिण्यापासून राणेंच्या पक्षाचे भाजपात विलिन होणार अशी चर्चा होती. अखेर विधानसभेच्या मतदानाला पाच दिवसाचा कालावधी शिल्लक उरताना त्याला मुहूर्त मिळाला आहे.
माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनीच पूर्वीच भाजपच्या कोट्यातून राज्यसभेत खासदारकी मिळवली आहे. आठ दिवसापूर्वी राणेंचे धाकटे चिरंजिव काँग्रेसचे आमदार नितेश राणे यांनी भाजपात प्रवेश करुन कणकवली मतदारसंघातून भाजपची उमेदवारी मिळवली. मात्र, त्यांच्या उमेदवारीवरून शिवसेनेनेही बंड पुकारत शिवसेनेचा अधिकृत उमेदवार दिला. त्यामुळे सिंधुर्दुगातील राजकारण चांगलेच तापले आहे.
आता राणेंच्या महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचाच भाजपामध्ये विलिनिकरण होणार असल्यामुळे त्यांच्या हतबलतेवर जोरदार टीका सुरु झाली आहे. राणेंनी काँग्रेससोडून चूक केली अशी जोरदार चर्चा सुरु आहे. भाजपामध्ये जाऊन राणे कुटुंबियांना कितपत फायदा होणार याचीच सर्वत्र चर्चा सुरु आहे.