Placeholder canvas
Friday, April 19, 2024
Homeउत्तर महाराष्‍ट्रनाशिकसरकारकडून शेतक-यांच्या मदतीकडे दुर्लक्ष : शरद पवार

सरकारकडून शेतक-यांच्या मदतीकडे दुर्लक्ष : शरद पवार

नाशिक : राज्यातील सत्ता स्थापनेवरून भाजप-शिवसेनेत वाद सुरू असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी नाशिकच्या नुकसाग्रस्त पिकांची पाहाणी केली. शेतक-यांशी संवाद साधला. यावेळी पवारांनी आरोप केला की, सरकारकडून काहीही सांगितलं जात नाही. नुकसानीचा अहवाल आम्ही सरकारला देऊ. सरकारने योग्य दखल घ्यावी.

शरद पवार यांनी आज नाशिकमध्ये इगतपुरीमधील भात पिकाच्या नुकसानीची पाहणी केली. शेतकऱ्यांचं नुकसान आणि त्यांच्या व्याथा जाणून घेतल्या. आमच्या हातचं पीक गेलंय. खूप नुकसान झालंय. जगावं की मरावं असा प्रश्न आमच्या समोर आहे. मात्र सरकारतर्फे कुणीच आलेलं नाही, असं शेतकऱ्यांनी पवारांना सांगितलं.

प्रशासनाने जिरायती आणि बागायती असा दुजाभाव न करता सरकसकट बागायती समजून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत करावी, असं पवार यांनी अधिकाऱ्यांना सूचवलं.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments