मुंबई : आमच्याकडे सत्तास्थापन करण्याचा आकडा नाही. भाजपाने सरकार बनवायला पाहिजे होते. आता राज्यपाल काय भूमिका घेतात याकडे आमचे लक्ष आहे. अशी माहिती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी माध्यमांशी बोलताना दिली.
यावेळी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे,माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची यावेळी उपस्थितीत होते. या सर्व नेत्यांची रात्री शरद पवारांच्या सिल्व्हर ओक निवासास्थानी बैठक झाली. यावेळी बोलताना थोरात यांनी काँग्रेस आघाडीची वेट अॅण्ड वॉचची भूमिका आहे असे सांगितले.
फडणवीस सरकारला जनतेन नाकारले- चव्हाण
देवेंद्र फडणवीस सरकारला जनतेन नाकारले. शेतक-यांकडे बघण्यासाठी वेळ नाही मात्र त्यांच्या मित्र पक्षांवर टीका करण्यासाठी वेळ आहे. अतिवृष्टीमुळे शेतकरी पंधरा दिवसापासून चिेंतेत आहे. त्यांना सरकारने मदत केली नाही. महाराष्ट्रावर कर्जाचा डोंगर उभा आहे. आता पुन्हा महाराष्ट्रात भाजप सरकार येणार नाही. असं माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितलं.