मुंबई : कोरोनाच्या वाढता प्रादूर्भाव लक्षात घेता लोकांनी घरात बसून कामं करावं. लोकलनं प्रवास टाळावा. गर्दीच्या ठिकाणी जाण्याचें टाळावं असं आवाहन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पत्रकार परिषदेत केलं आहे.
चुकीच्या अफवा पसरवणा-यांवर कारवाई करण्यात येईल असा इशारा गृहमंत्री देशमुख यांनी दिला आहे. नव्यानं भर्ती होणा-या कैदांना वेगळं ठेवण्यात येईल असंही देशमुख यांनी सांगितलं. पोलिसांची विशेष काळजी घेतली जात आहे असंही देशमुख यांनी सांगितलं. क्वारंटाइन करणारे रुग्ण पळून जात असल्याच्या घटना घडत आहे. जर कुणी असा प्रकार केला तर त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असंही गृहमंत्री देशमुख यांनी सांगितलं.