शिवसेना भाजपा युती होणार की नाही अशी चर्चा सुरु होती. मात्र आज अखेर दिल्लीत युतीवर शिक्कोमोर्तब झालं. भाजपला 144 तर शिवसेनेच्या वाट्याला 126 जागा व उपमुख्यमंत्रीपद अशा वाटाघाटी करण्यात आल्या आहेत. मित्रपक्षांना 18 जागा सोडण्यात येतील. अशी माहिती समोर येत आहे. परंतु अद्यापही दोन्ही पक्षांकडून अधिकृत घोषणा झाली नाही.
काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी जाहीर झाली. त्यानंतर वंचित, एमआयएमनेही आपआपले उमेदवार जाहीर केले. मनसेही उमेदवार देण्याच्या तयारीत आहेत. युती विषयी संभ्रम कायम होता, अखेर युतीवर शिक्कामोर्तब झाले. काय होणार अशी चर्चा सर्वत्र रंगली होती. विशेष म्हणजे युती तुटणार अशीही चर्चा रंगली होती. मात्र कोणत्या जागा कोणत्या पक्षाच्या वाटेवर येतील आता याकडे सर्वांचे लक्ष लागले आहेत.